#मी, आपण आणि सिस्टीम
तीच आशा ,तोच प्रवास तेच चेहेरे,अन तीच निराशा. एखाद्या पत्ता माहीत नसलेल्या पाचटाने वाऱ्यासोबत सैरपणे वाहनं. कुठं जायचं, कस जायचं माहीत नाही. तरीही कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या किड्या सारखं सुटण्याच्या आशेने, अजून गुंतत जायच.
'Struggle' चा खरा अर्थ त्याच्या नावात नसून त्याला जगण्यात आहे,हे खरंच म्हणावं लागेल. सगळं काही आहे, पण 'काहीच नसल्यासारखी' भावना मनात उगिच भीतीचे डोंगर निर्माण करते. अन थकलेल्या वाटसरू सारखी त्याची तृष्णा त्याला कोरडं बनवत जाते,मग पाहिलेल्या स्वप्नाचा एक एक धागा असा काही तूटत जातो की, मेंदूच्या चेता तंतूंनी आपलं कामच विसरुन जावं. अन मागे उरावा फक्त भग्न स्वप्नांचा सांगाडा! या चेताहीन सांगाड्याने कधी खऱ्या स्वप्नांची अपेक्षा पूर्ण केली आहे का?
हा काळ खरंच किती आत्मक्लेशाचा असतो ,हे ज्यांनी अनुभवलं नाही त्यांना तो कधीच कळणार नाही. रोजची तीच वाट ज्यावेळी ओळखीची होते परंतु आपल्या स्टेशनचा पत्ताच मात्र लागत नाही, त्याला ती किती असह्य वाटत असेल ! रोजचं वयाचं वाढणारं गाठोडं घेऊन मग मृगजळाच्या पाठीमागे धावायचं. त्याच त्वेषाने! पण हा त्वेष आणायचा तरी कुठून रोज रोज! जसा जसा रस्ता दूर जातो तशी संपत चाललेली आत्मविश्वाची शिदोरी आणायची तरी कुठून!
ही परिस्थिती आहे त्या तरुणाची! ज्याकडे सगळं काही आहे फक्त नाही ती संधी! येणाऱ्या दिवसाला नशिब नावाच्या घट्ट दोरीने बांधून कटु प्रसंगाला अन ठेचांना किती दिवस लपवायचं!
हो, मी अनुभवलं ,मी पण ! अशी म्हणणारी कितीतरी विशी-तिशी मधली मंडळी रोज कोणत्या तरी सरकारी ऑफिसात, कंपनीच्या दारात उभे राहताना दिसतात.अगदी त्या फुटबॉल सारखं...जिंकण्याच्या शर्यतीत आपण लाथाडले जातोय, हे विसरत....
कशासाठी असतो हा अट्टाहास??
'नोकरी' ती सरकारी असो वा कंत्राटी, ती भेटली म्हणजे तुम्ही एक नागरिक (सुजाण म्हणता येईल) म्हणून ओळखले जातात, ४ लोकांत आजवर वर न काढलेली छाती तुमहाला दिमाखात वर काढता येन अन आयुष्यातलं struggle संपलं म्हनून पूर्णविराम देन. यासाठी!!!
'Struggle' चा खरा अर्थ त्याच्या नावात नसून त्याला जगण्यात आहे,हे खरंच म्हणावं लागेल. सगळं काही आहे, पण 'काहीच नसल्यासारखी' भावना मनात उगिच भीतीचे डोंगर निर्माण करते. अन थकलेल्या वाटसरू सारखी त्याची तृष्णा त्याला कोरडं बनवत जाते,मग पाहिलेल्या स्वप्नाचा एक एक धागा असा काही तूटत जातो की, मेंदूच्या चेता तंतूंनी आपलं कामच विसरुन जावं. अन मागे उरावा फक्त भग्न स्वप्नांचा सांगाडा! या चेताहीन सांगाड्याने कधी खऱ्या स्वप्नांची अपेक्षा पूर्ण केली आहे का?
हा काळ खरंच किती आत्मक्लेशाचा असतो ,हे ज्यांनी अनुभवलं नाही त्यांना तो कधीच कळणार नाही. रोजची तीच वाट ज्यावेळी ओळखीची होते परंतु आपल्या स्टेशनचा पत्ताच मात्र लागत नाही, त्याला ती किती असह्य वाटत असेल ! रोजचं वयाचं वाढणारं गाठोडं घेऊन मग मृगजळाच्या पाठीमागे धावायचं. त्याच त्वेषाने! पण हा त्वेष आणायचा तरी कुठून रोज रोज! जसा जसा रस्ता दूर जातो तशी संपत चाललेली आत्मविश्वाची शिदोरी आणायची तरी कुठून!
ही परिस्थिती आहे त्या तरुणाची! ज्याकडे सगळं काही आहे फक्त नाही ती संधी! येणाऱ्या दिवसाला नशिब नावाच्या घट्ट दोरीने बांधून कटु प्रसंगाला अन ठेचांना किती दिवस लपवायचं!
हो, मी अनुभवलं ,मी पण ! अशी म्हणणारी कितीतरी विशी-तिशी मधली मंडळी रोज कोणत्या तरी सरकारी ऑफिसात, कंपनीच्या दारात उभे राहताना दिसतात.अगदी त्या फुटबॉल सारखं...जिंकण्याच्या शर्यतीत आपण लाथाडले जातोय, हे विसरत....
कशासाठी असतो हा अट्टाहास??
'नोकरी' ती सरकारी असो वा कंत्राटी, ती भेटली म्हणजे तुम्ही एक नागरिक (सुजाण म्हणता येईल) म्हणून ओळखले जातात, ४ लोकांत आजवर वर न काढलेली छाती तुमहाला दिमाखात वर काढता येन अन आयुष्यातलं struggle संपलं म्हनून पूर्णविराम देन. यासाठी!!!
मग दोष कुणाचा? 'सगळं' काही असणाऱ्या तरुणांचा की सिस्टिम नावाच्या अदृश्य राक्षसाचा? अन या सगळं असणाऱ्या तरुणाला हे कधी कळणार की त्याच्याकडे खूप काही आहे. वाळवीसारखं पोखरणाऱ्या या सिस्टमच्या किडेने कितीतरी जणांचे स्वप्नं सुद्धा अशीच पोखरली आहेत. मुळात संधी नाकारणं, संधी नसणं अन संधी असूनही नाकारलं जाणं यात फरक करता येत नाही ,केवळ या सिस्टिम मुळे..!!
अन "आपण" कुठे आहोत? चवताळलेल्या मधमाश्यांसारख तुटून पडतो आपण, एखाद्याच्या स्वप्नाना डंख मारण्यासाठी.
आधारासाठी अन सहानुभूती साठी धडपडणारी ही मंडळी स्वतःच्याच म्यांनातून होणाऱ्या वारांना कसा प्रतिरोध करणार??
यातला "मी" म्हणजे आजचा धडपडणारा तरुण....
जोपर्येंत "आऊट ऑफ द बॉक्स" ची ठिणगी आपल्यात पेटत नाय तोपर्येंत आपण आपल्याच लोकांनी रचलेल्या सरणावर जळणार आहोत....
आधारासाठी अन सहानुभूती साठी धडपडणारी ही मंडळी स्वतःच्याच म्यांनातून होणाऱ्या वारांना कसा प्रतिरोध करणार??
यातला "मी" म्हणजे आजचा धडपडणारा तरुण....
जोपर्येंत "आऊट ऑफ द बॉक्स" ची ठिणगी आपल्यात पेटत नाय तोपर्येंत आपण आपल्याच लोकांनी रचलेल्या सरणावर जळणार आहोत....